पंढरपूर तालुक्यातील तारापूर, दि. ३1 (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, बारामती तालुक्याचे आमदार व महाराष्ट्राचा लाडका नेता, कामाचा माणूस अशी ओळख असलेले अजित दादा पवार यांचे विमान अपघातात अकाली निधन झाले.
त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला असून, पवार परिवारावर आलेल्या या दुःखातून त्यांना सावरण्याचे बळ पांडुरंग परमात्मा अशी भावपूर्ण श्रद्धांजली तारापूर ग्रामस्थांचे वतीने व्यक्त करण्यात आली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती जवळ अपघ-ाती निधन झाले यामुळे पंढरपूर तालुक्यातील तारापूर या ठिकाणी असलेल्या त्यांच्या चाहत्यांनी तारापूर नाला चौकामध्ये
सभेचे आयोजन 31जानेवारी रोजी सकाळी केले होते. लोकांमध्ये दादांबद्दल अपार प्रेम आणि आदर होता. त्यांच्या कार्यामुळे प्रत्येक गावकऱ्यांच्या जीवनात फरक पडला आहे आणि त्यांच्या सामाजिक, विकासात्मक उपक्रमांमुळे दादांचे नाव सर्वत्र आदराने घेतले जाते. त्यांचे अकाली जाण्याने राज्यात भरुन न येणारी पोकळी निर्माण
झाली असल्याची भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केली. यावेळी तारापूर ,ग्रामपंचायत सदस्य फिरोज मुलानी ,माजी चेअरमन महादेव माने ,उद्योजक दादा जगताप
उमेश वाघमारे मच्छिंद्र नाना नायगुडे अलताफ मुलाणी सतिश जगताप, चेतन माने व अतिष गायकवाड आमोल शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते 💐🙏

#संविधान न्यूज चैनल व पोर्टल
