सोलापूर प्रतिनिधी: पंढरपूर,तालुक्यातील बंडी शेगाव मंडळ मध्ये सततच्या पावसामुळे अतिवृष्टी झाल्यामुळे मंडळाच्या आठ गावातील बंडी शेगाव वाखरी कवठाळी खेळ भाळवणी शेळवे वाडीकरोली पिराजी कुरोली शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात घराचे शेतीचे जनावराचे पिकाचे जमीन खरडून जाणे अशा प्रकारे नुकसान झाले आहेत त्या अनुषंगाने मंडळातील सर्व गावचा नुकसानीचे पंचनामे होऊन मदतनी मिळणे अपेक्षित होते

परंतु तसे शासनाकडून कोणत्याही प्रकारचे पंचनामे न होता मदत शेतकऱ्याला मिळालेले नाही शेतकऱ्यांमध्ये सरकार विषयी मोठ्या प्रमाणात असंतोष वातावरण निर्माण झाले आहे. त्या अनुषंगाने शुक्रवार दिनांक दहा दहा रोजी सकाळी दहा वाजता राष्ट्रीय मार्ग क्रमांक 965 बाजीराव वीर जवळ चौगुले वस्ती समोर बंटी शेगाव येथे शेतकरी कुटुंब पाळीव प्राणी जनावरासह शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंडळातील सर्व गावे आंदोलन करणार आहेत.
